या लोकसभा निवडणुकीत ‘निवडणूक आयोग’ आणि ‘प्रसारमाध्यमे’, या दोन्ही यंत्रणा मोदींच्या ‘प्रचारयंत्रणा’ म्हणून तर काम करत नाहीत ना?
निवडणूक आयोग आणि प्रसारमाध्यमे यांचे सत्ताधारी पक्षाचे लांगूलचालन हे भारतीय लोकशाहीसमोरील सर्वांत मोठे आव्हान म्हणून उभे ठाकले आहे. म्हणूनच भारतीय मतदारांनी या लोकसभा निवडणुकीत संविधानाचे संरक्षण करण्याची जबाबदारी निभवावी, असे अनेक जाणकार वारंवार सांगत आहेत. लोकसभेच्या उर्वरित पाच टप्प्यातील मतदानाद्वारे सुजाण नागरिक या दृष्टीने लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी पुढे येतील अशी आशा करूया!.......